retain big update (2023) राशनबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय
Retain big updates राज्य शासनाने राशनबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवे रेशन कार्ड बनलेले पण अद्याप धान्याचे वाटप सुरू न झालेल्या लाभार्थ्यांसाठी महत्वपूर्ण अपडेट आहे. 04/ सप्टेंबर/2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. या शासन निर्णयानुसार जिल्ह्या निहाय इष्टाक निश्चित करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 नुसार महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागात 76.32% एवढा लक्षांक तर शहरी भागासाठी 45.34% एवढा लक्षांक निश्चित केलेला आहे. परंतु राज्यासाठी दिलेल्या इष्टाकाची पुर्तता होत नसल्याने अंतोदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबांचा सुधारित ईष्टाक देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहे..
हे वाचा – या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळनार हेक्टरी 22500 रू नुकसान भरपाई..
याप्रमाणे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, पुणे ग्रामीण, पुणे शहर, सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, याचप्रमाणे जालना, बीड,नांदेड,धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशीम,अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर ग्रामीण, नागपूर शहर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, व गडचिरोली अशी जी 42 मंडळ आहेत या 42 मंडळासाठी जवळपास 255300 अंतदीय अन्न योजनेच्या शिधा पत्रिका व याप्रमाणे 5 कोटी 9231031 अशा प्रकारे ही जीप्राधान्य कुटुंबातील लाभार्थी आहेत अशी लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आलेली आहे.
हे वाचा – दुष्काळ जाहीर झाला तर शासनाकडून कोणत्या सवलती दिल्या जातात…
आणि यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील अंतोदय अन्न योजना याप्रमाणे प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या हे इष्टांक आता नव्याने देण्यात आलेले आहेत. ज्याच्यामुळे नव्याने रेशन कार्ड बनवलेल्या परंतु अद्याप धान्य वाटप न होणाऱ्या लाभार्थ्यांना यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. तरी नव्याने रेशन कार्ड काढलेल्या परंतु अद्याप धान्य वाटप सुरू नसलेल्या लाभार्थ्यांना हे महत्त्वाचे अपडेट आहे..
यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय (GR) येथे डाउनलोड करा...
अधिक माहिती खालील YOUTUBE video मध्ये पहा…