crop insurance 2021-22 मध्ये रब्बी पिकविमा कमी मिळालेला पिक विमा पुन्हा मिळनार
(crop insurance) शेतकर्याच्या पिकाचे विविध नैसर्गिक आपत्तीने ( अतीवृष्टी, दुष्काळ, पावसात खंड, गारपीट, किडरोग ) इत्यादी मुळे नुकसान होत असते. या नैसर्गिक आपत्ती पासून शेतकर्याचे आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी देशात तसेच राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येते.
रांऊडअपच्या निर्बंधांवर केंद्र सरकार कोणती भूमिका घेणार जाणून घ्या
सन 2021-22 मध्ये अतिवृष्टी मुळे आणि गारपिटीमुळे शेतकर्याचे पिकाचे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. कंपनीच्या अटीनुसार शेतकर्यानी 72 तासाच्या आतमध्ये (crop insurance) या ॲपवरुन आणि कंपनीच्या हेल्पलाईन नंबर वर काॅल करून क्लेम देखील केले आहेत. या प्रकरणात कंपनीने शेतकर्याला अतिशय अल्प प्रमाणात पिक विमा वितरित केला असल्यामुळे राज्य सरकारने पिक विमा 2021 साठी निधी वितरित करण्यासाठी (GR) निर्गमित केला आहे.
याबाबत शासन निर्णय (GR) येथे पहा✔️✔️
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांनी शेतकर्याला अतिशय अल्प प्रमाणात पिक विमा वाटप केला आहे. ज्या शेतकर्याला 1000 रुपयांपेक्षा कमी रक्कम मिळालेला आहे अशा शेतकर्याला प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुरक अनुदान रब्बी हंगाम 2021-22 करीता 6297815 एवढी रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
याबाबत शासन निर्णय (GR) येथे पहा✔️✔️